गणपती आरास करण्यासाठी शोभिवंत झाडांची मागणी

सुधागड-पाली (वार्ताहर) : पर्यावरण स्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. त्यामुळेच सजावटीसाठी आता थर्माकोल, प्लास्टिक आदी साहित्याव्यतिरिक्त नैसर्गिक व विघटनशील अशा साधनांचा वापर केला जात आहे. त्यामध्ये शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि कुंड्यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रोपवाटिका सजल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच या झाडांमुळे सुंदरता व आकर्षकपणादेखील येतो. शिवाय ही झाडे नंतर परसबागेची शोभादेखील वाढवितात.


पेण येथील सुहास पाटील यांनी प्रहारला सांगितले की, गेली अनेक वर्षे इकोफ्रेंडली आरास बनवितो. त्यामध्ये आकर्षक फुले व शोभिवंत झाडांचा वापर करतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनदेखील होते. शिवाय ही फुले किमान ५ दिवस टवटवीत राहतात. सध्या अनेक नर्सरी चालकांनी अशा स्वरूपाची शोभिवंत व फुलझाडे आणि विविध आकाराच्या व रंगाच्या कुंड्यादेखील आपल्या नर्सरीमध्ये विकण्यास ठेवल्या आहेत. तसेच गणेशोत्सवासाठी विशेष सूट व आकर्षक योजनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक कापडी, कागदी व पुठ्ठ्याच्या मखरांबरोबरच आता शोभिवंत फूल व झाडेदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी योगदान देत आहेत.


पर्यावरणाचे भान राखून कोणतेही सण व उत्सव साजरे केले पाहिजेत. त्यामुळेच नर्सरीत माफक दरात शोभिवंत झाडे व फुलझाडे तसेच कुंड्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. याबरोबरच या सर्वांची मांडणी व रचना कशी करावी याची माहिती व कल्पना मोफत देत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास थोडा हातभारदेखील लागत आहे. - अमित निंबाळकर, मालक, ग्रीनटच नर्सरी, पाली

Comments
Add Comment

Stock Market Update: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात तुफान घसरण सेन्सेक्स ६०९.६८ अंकांने व निफ्टी २२५.९० अंकांनी घसरला

मुंबई: सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. बाजारातील अस्थिरतेचा फटका

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

महाराष्ट्र शासनाकडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका ऐतिहासिक समारंभात, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट