पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तानातही महापूर

काबूल : पाकिस्तानपाठोपाठ आता अफगाणिस्तानातही महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्र आणि सत्ताधारी तालिबानच्या म्हणण्यानुसार, एका महिन्याच्या हंगामी पावसामुळे अफगाणिस्तानमध्ये अचानक पूर आला. या भीषण पुरात किमान १८२ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.


तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, 'अचानक आलेल्या पुरात २५० हून अधिक लोक जखमी झालेत, तर ३ हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.


युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इतर ३० जण बेपत्ता आहेत. त्याच वेळी १३ प्रांतातील ८,२०० हून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.


पूर्व लोगर प्रांतातील खुशी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी सांगितले की, या प्रदेशात प्रथमच पूर आला आणि जनावरं, घरं आणि शेतजमीन नष्ट झाली. लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. सर्व लोकांनी उंच डोंगरावर आश्रय घेतला आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना

पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस बॉम्बस्फोट करुन उडवण्याचा प्रयत्न, बलुचिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा

बांगलादेशातील हिंदूच्या हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून

चीनकडून बांगलादेशात लष्करी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ

नवी दिल्ली  : भारताला घेरण्यासाठी चीनने पाकिस्ताननंतर आपले लक्ष आता बांगलादेशवर केंद्रित केले आहे.