कोरोनाचा राज्याला मोठा फटका ; कॅगने केले अधोरेखित

Share

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) यांचा गेल्या आर्थिक वर्षाच्या राज्य सरकारच्या वित्तीय कारभारावरील अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. त्यात कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात आलेल्या कोरोना महासाथीमुळे व त्यामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून कोरोनाविरोधात उपाययोजनांसाठीही राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला होता. त्या आधीच्या वर्षातील करसंकलनाच्या मानाने २०२०-२१ वर्षातील करसंकलन १३.०७ टक्क्यांनी कमी झाले तसेच भांडवली खर्चातही १८.४८ टक्के इतकी कपात करावी लागली होती. त्याचवेळी राज्याचे कर्ज मात्र ५१.५९ टक्केंनी वाढले अशी टिप्पणी कॅगने केली आहे. वित्तीय तूट मात्र २.६९ टक्के या समाधानकारक प्रमाणात कायम राहिली. कारण खर्चात कपात झाली होती आणि खर्जाचे प्रमाणही ठोक राज्य उत्पन्नाच्या २ टक्के इतके राहिले.

महसुली जमा २०१९-२० या वर्षात २,८३,१८९.५८ कोटी इतके होते, ते २०२०-२१ या कालावधीत २,६९,४६७.९१ कोटी इतके कमी झाले, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अहवाल आर्थिक वर्षात सर्वप्रकारचे राज्य वस्तु व सेवा कराचे उत्पन्न १२.३२ टक्क्यांनी घटले. ही घट १२,६५३.०३ कोटी इतकी कमी झाली होती. खरेतर उत्पन्न मात्र ११.७४ टक्क्यांनी वाढले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून ०.७९ टक्के म्हणजेच २८४.३७ कोटी निधी आला. तसेच केंद्र सरकारचे योजना अनुदानही २०.६० टक्क्यांनी वाढून ९००८.०९ कोटी इतके आले, असेही या अहवालात म्हटले आहे.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

13 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

58 minutes ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

1 hour ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

1 hour ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

2 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

2 hours ago