Monday, May 12, 2025

महाराष्ट्रविधिमंडळ विशेषमहत्वाची बातमी

नामांतराचे ३ ठराव मंजूर

नामांतराचे ३ ठराव मंजूर

मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.


तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि मुंबईतील विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला. पण, आता अधिवेशनात नव्याने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत तीन प्रस्ताव मांडले, ते प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले आहे. तसेच, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment