टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण

  54

नवी दिल्ली : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल द्रविडची यूएईला जाण्यापूर्वी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसू शकतात.


आशिया कपमधूनच राहुल द्रविड कदाचित बाहेर जाऊ शकतात. मात्र, बीसीसीआयकडून राहुल द्रविडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणला झिम्बाब्वे दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. इतकेच नाही तर लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून टीम इंडियाशी जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होता. केएल राहुल आणि व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण यांनी झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप केला.


आशिया कपसाठी टीम इंडिया आज यूएईला रवाना होणार आहे. मात्र, राहुल द्रविड टीम इंडियासोबत यूएईला रवाना होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेहून यूएईला आलेल्या खेळाडूंसह आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाची मोहीम २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाशी टक्कर द्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन