नगरविकास खात्यात वरूण सरदेसाई काय करायचे? : नितेश राणे यांचा विधानसभेत सवाल

Share

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागच्या सरकारच्या काळात नगरविकास विभागाच्या आढावा बैठका कोण घेत होते? वरुण सरदेसाई तेथे काय करत असायचे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केला.

नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये थेट लोकांमधून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पद्धतीचा अवलंब करणारी सुधारणा करणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. त्याचे समर्थन करताना राणे बोलत होते. मुख्यमंत्री कमी बोलतात, पण काम जास्त करतात. पण गेल्या सरकारमध्ये नगरविकास खाते त्यांच्याकडे होते. पण, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते का? ते निर्णय घेऊ शकत होते का, की त्यांना निर्णय घ्यावे लागत होते? का त्यांना मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग स्वीकारावा लागला? एखादा सरपंचही आपले पद सोडत नाही. मग, सात – सात जण मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग का स्वीकारतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

कोणीतरी सदस्य म्हणे की, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विचारांवर ठाम राहावे. मागच्या सरकारमध्ये त्यांनी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची सुधारणा केला होती. ते आपल्या विचारावर ठाम आहेत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडलेला नाही. त्यामुळेच ते आपल्या सहकाऱ्यांसह जनतेने दिलेला कौल स्वीकारत त्यांनी हे सरकार स्थापन केले, असेही राणे म्हणाले.

मागच्या सरकारमध्ये त्यांना निर्णय घेता येत नव्हते. तेथील निर्णय कलानगरच्या वैभव चेंबर्समधून घेतले जायचे. सरकारच्या बैठकीत वरुण सरदेसाई काय करायचे? आठवड्यातल्या आढावा बैठका कोण घ्यायचे? शिंदे घ्यायचे की, माजी पर्यावरण मंत्री घ्यायचे? कोणीतरी सदस्य म्हणाले की, थेट निवडणुकीमध्ये धनदांडगेच निवडून येतील. गरिबांना निवडणूक लढविणे शक्य होणार नाही. आपण सर्व आमदार आहोत. आपल्या निवडणुकीवर होणाऱ्या खर्चातला काही भाग नगराध्यक्षासाठी उभे राहणाऱ्या सामान्य उमेदवाराला दिला तरी ते खर्च करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना आता मोकळेमोकळे वाटत आहे. त्यामुळेच एक चागले विधेयक त्यांनी आणले आहे. सर्वांनी ते मंजूर केले पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही राणे यांच्या भाषणाची दखल घेत आपल्या भाषणात त्याला दाद दिली.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

9 minutes ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

13 minutes ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

21 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

28 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

38 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

43 minutes ago