नगरविकास खात्यात वरूण सरदेसाई काय करायचे? : नितेश राणे यांचा विधानसभेत सवाल

  106

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागच्या सरकारच्या काळात नगरविकास विभागाच्या आढावा बैठका कोण घेत होते? वरुण सरदेसाई तेथे काय करत असायचे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केला.


नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये थेट लोकांमधून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पद्धतीचा अवलंब करणारी सुधारणा करणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. त्याचे समर्थन करताना राणे बोलत होते. मुख्यमंत्री कमी बोलतात, पण काम जास्त करतात. पण गेल्या सरकारमध्ये नगरविकास खाते त्यांच्याकडे होते. पण, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते का? ते निर्णय घेऊ शकत होते का, की त्यांना निर्णय घ्यावे लागत होते? का त्यांना मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग स्वीकारावा लागला? एखादा सरपंचही आपले पद सोडत नाही. मग, सात - सात जण मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग का स्वीकारतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.


कोणीतरी सदस्य म्हणे की, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विचारांवर ठाम राहावे. मागच्या सरकारमध्ये त्यांनी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची सुधारणा केला होती. ते आपल्या विचारावर ठाम आहेत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडलेला नाही. त्यामुळेच ते आपल्या सहकाऱ्यांसह जनतेने दिलेला कौल स्वीकारत त्यांनी हे सरकार स्थापन केले, असेही राणे म्हणाले.


मागच्या सरकारमध्ये त्यांना निर्णय घेता येत नव्हते. तेथील निर्णय कलानगरच्या वैभव चेंबर्समधून घेतले जायचे. सरकारच्या बैठकीत वरुण सरदेसाई काय करायचे? आठवड्यातल्या आढावा बैठका कोण घ्यायचे? शिंदे घ्यायचे की, माजी पर्यावरण मंत्री घ्यायचे? कोणीतरी सदस्य म्हणाले की, थेट निवडणुकीमध्ये धनदांडगेच निवडून येतील. गरिबांना निवडणूक लढविणे शक्य होणार नाही. आपण सर्व आमदार आहोत. आपल्या निवडणुकीवर होणाऱ्या खर्चातला काही भाग नगराध्यक्षासाठी उभे राहणाऱ्या सामान्य उमेदवाराला दिला तरी ते खर्च करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.


एकनाथ शिंदे यांना आता मोकळेमोकळे वाटत आहे. त्यामुळेच एक चागले विधेयक त्यांनी आणले आहे. सर्वांनी ते मंजूर केले पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही राणे यांच्या भाषणाची दखल घेत आपल्या भाषणात त्याला दाद दिली.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत