नाशिक (प्रतिनिधी) : देशातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नातून हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक सन्मान मिळालेले ॲड. निकम यांनी देशातील गुन्हेगारांना सुमारे ४० मृत्यूदंड आणि ३०० हून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या आहेत. ते आता डॉ. आशा गोयल या खटल्याचे नेतृत्व करतील. त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती.
निकम यांनी सर्वाधिक चर्चित अशा खून, सामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या कामकाज केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविले, ओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. गोयल यांची हत्या झाली तेव्हा त्या आपला भाऊ सुरेश अग्रवाल यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. सुरेशने टोरंटो येथील रहिवासी असलेला भाऊ सुभाष अग्रवाल यांच्या सोबतीने १२ दशलक्ष डॉलर्सच्या वारसा हक्कावरून असलेल्या वादामुळे बहिणीची हत्या करण्याचा कट रचला, असा आरोप होता. त्यानंतर सुरेशचा मृत्यू झाला, परंतु कॅनडाचे नागरिक असलेले सुभाष यांच्या विरोधात इंटरपोलने रेड नोटीस जारी करूनही ते टोरंटोमध्ये फरार आहेत. ते भारतात अजूनही वाँटेड आरोपी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.
मुंबई पोलिसांनी अन्य चार जणांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन जण प्रदीप परब, पवनकुमार गोएंका आणि मनोहर शिंदे हे अग्रवाल बंधूंचे कर्मचारी होते.
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले.…
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…