उज्ज्वल निकम यांची डॉ. आशा गोयल खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

नाशिक (प्रतिनिधी) : देशातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नातून हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.


अनेक सन्मान मिळालेले ॲड. निकम यांनी देशातील गुन्हेगारांना सुमारे ४० मृत्यूदंड आणि ३०० हून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या आहेत. ते आता डॉ. आशा गोयल या खटल्याचे नेतृत्व करतील. त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती.


निकम यांनी सर्वाधिक चर्चित अशा खून, सामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या कामकाज केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविले, ओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या.


तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. गोयल यांची हत्या झाली तेव्हा त्या आपला भाऊ सुरेश अग्रवाल यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. सुरेशने टोरंटो येथील रहिवासी असलेला भाऊ सुभाष अग्रवाल यांच्या सोबतीने १२ दशलक्ष डॉलर्सच्या वारसा हक्कावरून असलेल्या वादामुळे बहिणीची हत्या करण्याचा कट रचला, असा आरोप होता. त्यानंतर सुरेशचा मृत्यू झाला, परंतु कॅनडाचे नागरिक असलेले सुभाष यांच्या विरोधात इंटरपोलने रेड नोटीस जारी करूनही ते टोरंटोमध्ये फरार आहेत. ते भारतात अजूनही वाँटेड आरोपी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.


मुंबई पोलिसांनी अन्य चार जणांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन जण प्रदीप परब, पवनकुमार गोएंका आणि मनोहर शिंदे हे अग्रवाल बंधूंचे कर्मचारी होते.

Comments
Add Comment

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण