उज्ज्वल निकम यांची डॉ. आशा गोयल खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

  93

नाशिक (प्रतिनिधी) : देशातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नातून हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.


अनेक सन्मान मिळालेले ॲड. निकम यांनी देशातील गुन्हेगारांना सुमारे ४० मृत्यूदंड आणि ३०० हून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या आहेत. ते आता डॉ. आशा गोयल या खटल्याचे नेतृत्व करतील. त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती.


निकम यांनी सर्वाधिक चर्चित अशा खून, सामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या कामकाज केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविले, ओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या.


तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. गोयल यांची हत्या झाली तेव्हा त्या आपला भाऊ सुरेश अग्रवाल यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. सुरेशने टोरंटो येथील रहिवासी असलेला भाऊ सुभाष अग्रवाल यांच्या सोबतीने १२ दशलक्ष डॉलर्सच्या वारसा हक्कावरून असलेल्या वादामुळे बहिणीची हत्या करण्याचा कट रचला, असा आरोप होता. त्यानंतर सुरेशचा मृत्यू झाला, परंतु कॅनडाचे नागरिक असलेले सुभाष यांच्या विरोधात इंटरपोलने रेड नोटीस जारी करूनही ते टोरंटोमध्ये फरार आहेत. ते भारतात अजूनही वाँटेड आरोपी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.


मुंबई पोलिसांनी अन्य चार जणांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन जण प्रदीप परब, पवनकुमार गोएंका आणि मनोहर शिंदे हे अग्रवाल बंधूंचे कर्मचारी होते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पंढरपूर : शासकीय महापूजेच्या निमित्ताने पंढपूरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.