उज्ज्वल निकम यांची डॉ. आशा गोयल खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

नाशिक (प्रतिनिधी) : देशातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नातून हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.


अनेक सन्मान मिळालेले ॲड. निकम यांनी देशातील गुन्हेगारांना सुमारे ४० मृत्यूदंड आणि ३०० हून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या आहेत. ते आता डॉ. आशा गोयल या खटल्याचे नेतृत्व करतील. त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती.


निकम यांनी सर्वाधिक चर्चित अशा खून, सामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या कामकाज केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविले, ओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या.


तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. गोयल यांची हत्या झाली तेव्हा त्या आपला भाऊ सुरेश अग्रवाल यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. सुरेशने टोरंटो येथील रहिवासी असलेला भाऊ सुभाष अग्रवाल यांच्या सोबतीने १२ दशलक्ष डॉलर्सच्या वारसा हक्कावरून असलेल्या वादामुळे बहिणीची हत्या करण्याचा कट रचला, असा आरोप होता. त्यानंतर सुरेशचा मृत्यू झाला, परंतु कॅनडाचे नागरिक असलेले सुभाष यांच्या विरोधात इंटरपोलने रेड नोटीस जारी करूनही ते टोरंटोमध्ये फरार आहेत. ते भारतात अजूनही वाँटेड आरोपी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीच्या हत्येशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे.


मुंबई पोलिसांनी अन्य चार जणांनाही अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन जण प्रदीप परब, पवनकुमार गोएंका आणि मनोहर शिंदे हे अग्रवाल बंधूंचे कर्मचारी होते.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय