
जालना : समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
समर्थांचे जालन्यातील जन्मगाव जांब समर्थ येथील राम मंदिरातून राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. समर्थ रामदास स्वतःत्या झोळीत जी मूर्ती ठेवायचे ती देखील चोरीला गेलीय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे..