विलास खानोलकर
एका शिंप्यास समंध बाधा होती, याची जाणीव त्याला नव्हती. पण श्री स्वामी त्याबद्दल कसे अनभिज्ञ राहणार? शिंप्याची समंध बाधा घालविण्यापूर्वी श्री स्वामींनी त्याच्याकडून अन्नदानाचे पुण्य करून घेतले. ५० लोकांच्या स्वयंपाकात ५०० माणसे जेवू शकली. त्याच्या या पुण्यशील कृतीमुळे काही प्रमाणात का होईना, समंधबाधित शिंप्याचे प्रारब्ध सौम्य झाले होते. समंधाला नेहमी गती (म्हणजे पुढील अवस्था) हवी असते. तशीच त्या शिंप्यामधील समंधालाही हवी असणारच. प्रसाद भोजनानंतर समंधबाधित शिंपी श्री स्वामींपुढे येऊन बसला. श्री स्वामी हे तर अशा समंधाचे कर्दनकाळ. समंधचा क्रोध श्री स्वामींना पाहताच उफाळून आला. ‘संन्याशास (श्री स्वामींस) असले खेळ कशाला पाहिजेत?’ म्हणून तो मोठमोठ्याने ओरडून नाचू लागला; परंतु श्री स्वामी समर्थांचे दर्शनच इतके प्रभावी होते की, त्यापुढे समंधाची मात्रा चालली नाही.
श्री स्वामी महाराज गरजले, ‘समंधाच्या मुसक्या बांधा’ श्री स्वामी मुखातील वाक्य म्हणजे महामंत्र, हे वाक्य ऐकताच त्या समंधाची स्थिती लुळी-पांगळी झाली. समंध पूर्णतः हतबल झाला. त्याला ती अवस्था सहन होईना. समंध श्री स्वामींची पार्थना करून सारखा पाया पडू लागला. श्री स्वामी तर कृपेचे सागर. त्यांनी समंधावर कृपा करून त्यास मुक्ती दिली. त्यासरशी सबंधबाधित शिंपी समंधातून मुक्त होऊन उठून बसला. समंधमुक्त शिंप्याने त्याचे उर्वरित आयुष्य श्री स्वामी उपासनेत घालविले.
या लीलेचा मथितार्थ इतकाच की, श्री स्वामी समर्थ सेवा कुणामध्येही अदृश्य स्वरूपात असलेली समंध बाधा अथवा पिशाच्चबाधेचे उच्चाटन करून त्या व्यक्तीस मुक्त आनंदी व सुखी करते. श्री स्वामी समर्थांच्या या सामर्थ्याबद्दल श्री गुरूलीलामृतात म्हटले आहे, ‘तंत्र-मंत्र-यंत्र-धूप-अंगारे दोरे। अन्न, वस्त्र फलादिक सर्व उतारे। न लगती पंचाक्षरी भूत काढणारे। द्रव्य देणारे फसवूनि ।।१३३।। अंगात आणणे बोलविणे।, हे काहीच न लगे करणे। केवळ दत्तात्रेय स्वामिदर्शने। पिशाच्यादि पावती सुगतीस ।।१३४।।‘ (श्री गुरूलीलामृत अ. ४८ श्लो. १३३,१३४)
ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकरांनी श्रीगुरू लीलामृतात केलेले वर्णन सद्यस्थितीतही लागू पडणारे आहे. ज्यांचे समंध, भूत, पिशाच्च, प्रारब्ध आदीबाबत घोर अज्ञान आहे. भोंदू, साधू, बुवा आदी अशा साध्या-भोळ्या, गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. मंत्र-तंत्र-यंत्र-धूप-अंगारे-धुपारे आदींचा वापर करून लुटतात. हे आपण ऐकतो, पाहतो, वाचतो पण बोध काय घेतो? श्री स्वामी समर्थंना अपेक्षित असलेली अंधश्रद्धा वाढू न देणे, हीसुद्धा श्री स्वामी समर्थ उपासनाच आहे.
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…