विरार (प्रतिनिधी) : थकित वीजबिल वेळेत भरा, अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कापले जाईल, असा मॅसेज ब-याचशा वीज ग्राहकांना आल्यानंतर ग्राहकांची झोप उडाली आहे. याबाबत ग्राहकांनी मुख्य वीज अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर क्रमांकावरून आलेला मॅसेज व सदर क्रमांकच फ्रॉड असल्याचे सांगितले आहे. अफवा पसरवणा-या बनावट वीज मॅसेजवर कोणत्याही ग्राहकाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वीज वितरण महामंडळाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या वसईतील ग्राहकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर मॅसेज येत असून थकीत वीजबिल त्वरित भरा; अन्यथा रात्री ९.३० वाजता वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोबाईलवर आलेला मॅसेज हा इंग्रजीमध्ये असून या मॅसेजबाबत ग्राहकांनी वीज वितरण महामंडळाकडे चौकशी केली असता त्यांनी हा मॅसेज बनावट असल्याचे म्हटले आहे.
ज्या क्रमांकावरून मॅसेज आला त्या क्रमांकाबाबत वीज वितरण महामंडळाने पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. अशा बनावट मॅसेजवर वीज ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वीज वितरण महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…