निर्बंधमुक्त सण, मात्र तरीही जबाबदारी गरजेची

Share

सीमा दाते

गेले दोन वर्षे कोरोनामुळे सगळ्याच सणांवर निर्बंध आले होते. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे नागरिकांना सण साजरे करता येत आहे. मात्र यासाठी नागरिकांनी भान हरपून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सध्या जन्माष्टमी, दहीहंडी उत्साहाने साजरे झाले, तर अवघ्या काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठीही निर्बंधमुक्त मुंबई सज्ज झाली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष पाहायला मिळणार आहे, तर दर वर्षीप्रमाणे यंदा परळ लालबाग पुन्हा दुमदुमणार आहे. याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे सगळ्यांनीच अभिनंदन केले आहे. मात्र तरीही कोरोनाची भीती मात्र गेलेली नाही. गेल्या दोन वर्षांत मुंबईत कोरोनाचा कहर होता. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे नियम आखले होते. यामुळे सगळ्याच सणांवर निर्बंध आणले होते. मात्र आता कोरोना रुग्णसंख्येचा प्रभाव कमी झाल्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सणांवरील निर्बंध काढले आहेत. मात्र आता गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या ही पार गेली आहे. त्यामुळे सण साजरे करताना यंदा निर्बंध नसले तरी भान ठेवूनच साजरे करावे लागणार आहेत.

१९ ऑगस्ट रोजी मुंबईत १०११, तर २० ऑगस्ट रोजी ८४० इतकी कोरोना रुग्णसंख्या होती. ही रुग्णसंख्या एकदम वाढत नसली, तरी हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून सण साजरे करताना जागरूक राहणेही तितकेच गरजेचे आहे. सरकारने सण निर्बंधमुक्त केले, ही चांगलीच बाब आहे. पण सध्या वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आणखीन वाढू नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा सण, उत्सव साजरे करण्यासाठी चांगलीच सवलत मिळाली आहे. यामुळे सण, उत्सव जोरातच साजरे होणार आहेत. मात्र सणांच्या दरम्यान होणारी गर्दी, बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी ही कोरोना वाढण्यासाठी कारणीभूत ठरू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपण स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेने मुंबईत मास्कसक्ती देखील हटविली आहे. मात्र वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता मास्क वापरणे बांधनकारक नसले, तरी आवाहन करण्यात आले आहे. आपण आपली काळजी घेण्यासाठी जबाबदारीने वागणे आणि भान ठेवणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यापैकी ९५ टक्के रुग्ण हे लक्षणविरहित आहे. या रुग्णांमध्ये कोरोनासंबंधीत कोणतीच लक्षणे दिसत नाही, तर केवळ ५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहे.त्यामुळे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होणार आहे म्हणून सरकारने गणेशोत्सव मंडळांना उंच मूर्त्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसाठीही या वर्षी परवानगी दिली आहे तसेच रस्त्यांवर सर्वजनिक ठिकाणी बांधणारे मंडप, त्यासाठी महापालिका आणि इतर विभाग अग्निशमन दल यांना देणारी रक्कमही पालिकेने या वर्षी रद्द केली आहे. त्यामुळे आधीच गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांना जबाबदारी पाळूनच आनंदाने सण, उत्सव साजरे करावे लागणार आहेत. येत्या काही दिवसांत गणपती उत्सवानंतर आगामी काळात दसरा, दिवाळीसारखे मोठे सण येणार आहेत. या काळात लोक एकमेकांना भेटत असतात. इतकेच नाही, तर बाजारातही या सणांमध्ये गर्दी असते. त्यामुळे येत्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी पालिका प्रयत्न करेलच. मात्र नागरिकांनीदेखील सतर्क राहावे लागणार आहे.त्यामुळे सण, उत्सव साजरे करताना नागरिकांना गाफील होऊन चालणार नाही.

सध्या मुंबईत दहीहंडीचा सण जोरदार साजरा झाला. मात्र येणाऱ्या गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये ही गर्दी जास्त होत असते. राज्य सरकारने सण निर्बंधमुक्त केल्यानंतर पालिकेनेही कोणते निर्बंध ठेवले नाहीत. गेल्या दोन वर्षांत सगळ्याच पर्यटन क्षेत्रावरही बंदी होती. गेल्या वर्षात कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, चौपाट्या, हॉटेल, धार्मिक स्थळे, मंदिरे या सगळ्यांसाठी ती नियमावली होती. मात्र आता सर्वच उद्याने, मैदाने चौपाट्या सामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या आणि म्हणूनच पुन्हा एकदा भीती वाढू लागली. त्यातच लोकही आता बिनधास्त झाले आहेत. मात्र असे असताना सध्या मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्यामुळे आता नागरिकांनी देखील सण साजरे करावेच. पण योग्य ती काळजी घेऊनच. यंदा शिंदे आणि फडणवीस सरकारने सणांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्याच नागरिकांचे सण आनंदाने साजरे होणार आहेत. लालबाग-परळमध्ये गेल्या दोन वर्षांत न झालेली लगबग सुरू झालेली आहे. मात्र आता नागरिकांना आपल्या जबाबदारीचे भान जपत सण साजरे करावे लागणार आहेत.

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

48 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

56 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

1 hour ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

2 hours ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago