Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीबारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा चर्चेतून मार्ग निघू शकतो : निलेश राणे

बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा चर्चेतून मार्ग निघू शकतो : निलेश राणे

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे हे बारसू गावात पोहोचले होते. मात्र, रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी निलेश राणे यांनी आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

माजी खासदार निलेश राणे ग्रामस्थांना म्हणाले, यावेळी मी आहे, आपण बसून बोलू. चर्चा करू, हा राज्य आणि केंद्र सरकारने प्रकल्प आणला आहे. हा निलेश राणेचा प्रकल्प नाही. सरकारशी बोलावे लागेल. आता अधिवेशने सुरु आहेत. सरकारशी बोलून मार्ग काढू अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली.

नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तिकडे विनाशकारी ठरते, मग आमच्या गावात ती चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलकांमधील महिलांनी केला. यावेळी नितेश राणे यांनी तुम्ही जागा ठरवा आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, ते सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, ते ठिकाण सांगणार आहेत, असे म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -