Categories: रिलॅक्स

अमृत महोत्सवानिमित्त आरोग्याची पंचसूत्री

Share

डॉ. लीना राजवाडे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एक राष्ट्र म्हणून आपण केलेल्या प्रगतीबद्दल आपले सर्वांचे कौतुक केले तसेच २०४७ साली भारताचे स्वातंत्र्याचे १००वे वर्ष साजरे होत असताना भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून  ‘अमृतकाल’ असे संबोधित पुढील २५ वर्षांच्या वाटचालीत देशवासीयांसाठी पाच प्रतिज्ञांची यादी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची ताकद ही विविधता आणि महत्त्वाकांक्षी समाजात आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वत:साठी आणि अर्थातच देशासाठी करावयाच्या ५ प्रतिज्ञा सांगितल्या. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ या संकल्पपूर्तीसाठीदेखील या पाचही प्रतिज्ञा सूत्रांचा नक्कीच विचार करता येईल, असे मा‍झ्या मनात आले. तेव्हा त्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी अधिक विचार मांडण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करते आहे.

२०४५ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे : पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०४५ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षात प्रवेश करेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला पाहिजे.  “मी तरुणांना त्यांच्या आयुष्यातील पुढील २५ वर्षे देशाच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करतो; आम्ही संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी काम करू”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचा अर्थ आपण वैयक्तिक, सामाजिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

वसाहतवादाच्या सर्व खुणा काढून टाकणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने आपल्या कृतीतून आणि आपल्या मानसिकतेतून वसाहतवाद आणि गुलामगिरीच्या अवशेषांपासून स्वत:ची सुटका करणे महत्त्वाचे आहे.” “आम्ही ‘विकसित भारत’साठी काम करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि आपल्या हृदयाच्या कानाकोपऱ्यांतून औपनिवेशिक मानसिकतेच्या सर्व खुणा काढून टाकल्या पाहिजेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक, वैचारिक, भावनिक आरोग्यासाठी आपण तेवढेच महत्त्व दिले पाहिजे.

आपली मुळे आणि वारशाचा अभिमान बाळगणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने देशाच्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण विकासात प्रगती करत असताना रूजले पाहिजे.” “आपल्या वारशाचा, आपल्या मुळांचा आपल्याला अभिमान असायला हवा.  कारण जेव्हा आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहतो, तेव्हाच आपण उंच उडू शकतो आणि जेव्हा आम्ही उंच उड्डाण करू, तेव्हा आम्ही संपूर्ण जगाला उपाय देऊ,” पंतप्रधान म्हणाले. भारतीय शाश्वत मूल्यं, विज्ञान, वैद्यक शास्त्र यात संशोधन झाले पाहिजे. पर्यायी नव्हे, तर ते पहिले वैद्यक शास्त्र वाटले पाहिजे.

एकता आणि अखंडता : समानता हा भारताच्या प्रगतीचा आधार स्तंभ आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपण ‘भारत प्रथम’ या मंत्राद्वारा एकजूट आहोत, याची खात्री करणे आवश्यक आहे.  “विविधतेत एकता सुनिश्चित करण्यासाठी आपण लैंगिक समानता सुनिश्चित केली पाहिजे.  आणि हे साध्य करण्यासाठी आपण आपल्या घरातील असमानतादेखील संपवली पाहिजे.”  मुली आणि पुत्रांना समान वागणूक दिली नाही, तर एकता राहणार नाही. स्त्री-पुरुष दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे.

नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना : पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह भारतातील प्रत्येक नागरिकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यासाठी ते कर्तव्याच्या भावनेने परिपूर्ण आहेत.  वीज, पाणी वाचवणे हे लोकांचे कर्तव्य आहे. जर आपण याचे पालन केले, तर आपण वेळेपूर्वी अपेक्षित परिणाम गाठू शकतो, तसेच “कोणत्याही राष्ट्राने प्रगती केली आहे, हे त्यांच्या नागरिकांमध्ये शिस्त कशी रूजलेली आहे, यावरून समजते. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या, तर भारताचा उदय लवकर होईल.”

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

46 seconds ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

6 minutes ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

21 minutes ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

35 minutes ago

CSK vs SRH, IPL 2025: हर्षल पटेलची भेदक गोलंदाजी, चेन्नईचे हैदराबादला १५५ धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…

59 minutes ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

1 hour ago