रत्नागिरी : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवरील एकूण पाच जणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.
या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही.