आरोपीच्या टोळीला मदत करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

अहमदनगर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेत धर्मांतर करुन तिच्याशी निकाह करीत अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीसह त्याच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप मदत करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशीअंती संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या अहवालावर पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी ही कारवाई केली आहे.


तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह केला होता. तसेच तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आहे. आरोपींविरुद्ध इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असताना पोलिस निरीक्षक संजय सानप हे त्यांना मदत करत असल्याचा आरोप फिर्यादीकडून पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आला होता. चौकशीअंती पो.नि. सानप यांना निलंबित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन