मुंबई : मुंबईमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली. शिवसेनेने मुंबईला केवळ भ्रष्टाचार दिला, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन शेलारांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. देशातील अनेक राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. महापालिका एवढी श्रीमंत असताना मुंबईकरांसाठी शिवसेनेने काय केले? त्यांना कोणत्या सुविधा दिल्या? असा सवाल आशिष शेलारांनी केला.
मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली, राज्याच्या राजधानीत ५२ पूल नितीन गडकरींनी बांधले, कोस्टल रोडची मुहुर्तमेढ देवेंद्र फडणवीसांनी रोवली, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने निधी दिला, असे सांगत मुंबईच्या विकासामध्ये भाजपा नेत्यांचे योगदान शेलारांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान झाला नाही, असेही शेलार यांनी या कार्यक्रमात म्हटले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईची सत्ता भाजपाला मिळेल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.
“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…