रानभाज्यांचे मार्केटींग होणे गरजेचे : नितेश राणे

  120

देवगड (प्रतिनिधी) : रानभाज्या महोत्सवाने बचत गटांना प्रोत्साहन प्राप्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने असे महोत्सव झाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून याची आपण दखल घेऊन रानभाजी महोत्सवांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील. आता शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांचे हित जपणारे आपले सरकार या राज्यात आले आहे. दिवसेंदिवस रानभाज्यांचे महत्व पाहता त्याचे मार्केटींग होणे गरजेचे आहे. यातूनच उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव पार पडला. कृषी विभाग, कृषी तंत्र ज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती- देवगड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- देवगड (उमेद) आणि देवगड- जामसंडे नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.


या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार राणे बोलत होते. यावेळी आत्माचे अध्यक्ष महेश पाटोळे, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, योगेश पाटकर, संदीप साटम, अमोल तेली, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, जि. प. च्या माजी सदस्या सावी लोके, विभागीय अध्यक्ष शैलेश लोके, भाजप शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तन्वी शिंदे, मिलिंद माने आदी उपस्थित होते. आमदार राणे म्हणाले, बचत गटातील महिलांना ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या समस्या त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.


रानभाज्यांचे आहारातील महत्व, त्यांचे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म याची माहिती सर्व सामान्यांना मिळावी. तसेच रानभाज्याच्या पाककृतीची माहिती व्हावी, रानभाज्यांचा वापर वाढवावा, या उद्देशाने रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी सल्लागार समितीचे (आत्मा) अध्यक्ष महेश पाटोळे यांनीही मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

Legal Notice to Laxman Hake: "सात दिवसांत माफी मागा नाहीतर.." लक्ष्मण हाकेंना अजित पवारांकडून कायदेशीर नोटीस

माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा बारामती: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपमुख्यमंत्री अजित

BRICS Summit 2025: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलला पोहोचले, गणेश वंदनाने झाले स्वागत

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत रिओ दि जानेरो: १७ वी

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित