रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडून समर्थन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाकडून कमी किमतीत कच्च्या तेलाची आयात करण्याच्या भूमिकेचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतीयांना कमी किमतीत ऊर्जा निर्माण करता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण रशियाकडून कमी दरात कच्चे तेल आयात करत आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते बँकॉकमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.


सर्व देशांना विकासासाठी ऊर्जेची गरज आहे, मग कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता फायदेशीर व्यवहार करण्याकडे त्यांचा कल असतो. भारतानेही हाच मार्ग अवलंबला असल्याचे एस जयशंकर यांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असेलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निर्बंध घातले असतानाही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवली आहे.


भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे दीड लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आपला देश महाग किमतीमध्ये उर्जा खरेदी करू शकत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात चांगला व्यवहार करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीयांचे हितसंबंध जपण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. रशियातील तेल आयातीवरून अमेरिका सातत्याने भारताला लक्ष्य करताना दिसत आहे. या प्रश्नी भारतावर होणाऱ्या टीकेवर बुधवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे