नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाकडून कमी किमतीत कच्च्या तेलाची आयात करण्याच्या भूमिकेचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतीयांना कमी किमतीत ऊर्जा निर्माण करता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण रशियाकडून कमी दरात कच्चे तेल आयात करत आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते बँकॉकमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
सर्व देशांना विकासासाठी ऊर्जेची गरज आहे, मग कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता फायदेशीर व्यवहार करण्याकडे त्यांचा कल असतो. भारतानेही हाच मार्ग अवलंबला असल्याचे एस जयशंकर यांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असेलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निर्बंध घातले असतानाही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवली आहे.
भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे दीड लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आपला देश महाग किमतीमध्ये उर्जा खरेदी करू शकत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात चांगला व्यवहार करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीयांचे हितसंबंध जपण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. रशियातील तेल आयातीवरून अमेरिका सातत्याने भारताला लक्ष्य करताना दिसत आहे. या प्रश्नी भारतावर होणाऱ्या टीकेवर बुधवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…