Thursday, April 24, 2025
Homeदेशपंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड : लाल किल्ल्यावर १ तास २२ मिनिटे ३२...

पंतप्रधान मोदींचा नवा रेकॉर्ड : लाल किल्ल्यावर १ तास २२ मिनिटे ३२ सेकंदांचे भाषण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या भाषणाच्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर १ तास २२ मिनिटे ३२ सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते. मात्र, आता त्यांनी स्वत:चाच हा विक्रम मोडीत काढला आहे.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी देशाला उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणाची लांबी ७२ मिनिटे होती. २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी ९४ मिनिटांचे भाषण करत हा विक्रम मोडीत काढला. २०१४ पासून नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा ९० मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले आहेत. २०१७ साली ते सर्वात कमी म्हणजे ५६ मिनिटं बोलले होते. तर २०१८ मध्ये ८३ मिनिटं, २०१९ मध्ये ९२ मिनिटं, २०२० मध्ये ९० मिनिटं, तर २०२१ मध्ये ८८ मिनिटांचे भाषण पंतप्रधान मोदींनी केले होते.

नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत अलीकडच्या काळातील पंतप्रधानांच्या भाषणाची लांबी फारच कमी होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ आणि २००३ साली अनुक्रमे २५ आणि ३० मिनिटांचे भाषण केले होते. मनमोहन सिंह यांनी दहा वेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी ५० मिनिटं इतका होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच लांबलचक भाषणांची सुरु केलेली परंपरा कायम आहे. आज नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक लांबीचे भाषण करुन नवा मापदंड रचला आहे.

आगामी काळात भारताच्या विकासाच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचप्राण’ या नव्या संकल्पनेनुसार वाटचाल करण्याची घोषणा केली आहे.

देशाला संबोधित करताना मोदी यांनी भारतीयांना पाच संकल्प दिले. येत्या काळात आपण ‘पंचप्राण’ वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

  • पहिले – विकसित भारताचे मोठे संकल्प घेऊन पुढे जा.
  • दुसरे – गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका.
  • तिसरे – आपल्या वारशाचा अभिमान बाळगा.
  • चौथे – एकतेचे सामर्थ्य.
  • पाचवे – नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -