नाशिक (प्रतिनिधी): श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असल्याने ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी रविवार दुपारपासून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येऊ लागले. खासगी वाहनांना बंदी असल्याने एसटी महामंडळाच्या ३०० बसेसच्या तब्बल २५०० हून अधिक फेऱ्या झाल्या.
या फेऱ्यातून २ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्यात आली. दरम्यान फेरी मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २०० हून अधिक पोलिसही तैनात करण्यात आले होते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भाविक कुशावर्त येथे स्नान करून ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालतात.
कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून फेरीस प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली होती. मात्र यंदा शासनाच्या वतीने निर्बंध हटवल्याने प्रदक्षिणेस जाण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीच्या नियोजनासाठी खासगी वाहनांना बंदी असल्याने त्र्यंबकेश्वरसाठी एसटीच्या वतीने ३०० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ८ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत जुने सीबीएस परिसरात बसेससाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…