मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने मुंबईची चिंता वाढवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६७ नवे रुग्ण आढळून आले. २०४० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी २०४० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८०,७०,२५८ इतके झाले आहेत. राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मुंबईमध्ये आज ८६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपामध्ये १५९ रुग्ण आढळले. राज्यात इतर ठिकाणी १०० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सोलापूर मनपामध्ये आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जळगाव, परभणी आणि अमरावती मनपामध्ये फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद झाली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या ११८४७ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये चार हजार ६२४ सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाणे १४०१, पुणे २११९, नागपूर ६५२ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी सक्रीय रुग्ण परभणीमध्ये आहेत. परभणीमध्ये १४ सक्रीय रुग्ण आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…