अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायची आहेत

  99

मुंबई : आपल्याकडे आता अडीच वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात पाच वर्षांची काम करायची आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते.


फडणवीस म्हणाले, आता आपले सरकार आले आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यंत्री आहे. आपल्याकडील अडीच वर्षे निघून गेली आहेत. आता पुढील अडीच वर्षात पाच वर्षांची धाव आपल्याला घ्यायची आहे. तसेच महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती. ज्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरु झाली होती. ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून वेगाने तो धावला पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे.


मागच्या काळात शेतकऱ्यांवर आपत्ती आली तरी सरकार घोषणा करायचे पण पैसे देत नव्हते. पण आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. आपले सरकार आलेले आहे. आता सर्व अन्याय दूर करायचे आहेत. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी या खात्याला न्याय दिला होता. आता प्रदेशाध्यक्षपदाला ते न्याय देतील, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी