शिंदे गट दादरमध्येच प्रतिसेनाभवन आणि प्रभागात स्वतंत्र शाखा उभारणार

  93

मुंबई : मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.


शिंदे आणि ठाकरे वाद आता चांगलाच उफाळून आला असून दोघांच्या चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत आता शिंदे गटाने नवा डाव खेळला आहे. ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट मुंबईत प्रति सेना भवन उभारणार आहे. दादरमध्येच हे नवे सेना भवन उभारले जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली. परंतु, याबाबत बोलताना सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.


आज एक आभास निर्माण केला जात आहे की मुंबईवर ठाकरे गटाचे राज्य आहे. मात्र मुंबईतली जनता, शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. यामुळे आता प्रत्येक प्रभागामध्ये वेगळे कार्यालय उभारण्यात येणार आहे.


सरवणकर पुढे म्हणाले की, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचे एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.


दरम्यान, शिंदे गटाच्या या मुख्य कार्यालयाचे नाव काय असणार याबाबत अध्याप माहिती मिळालेली नाही.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता