Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर


  • १८ सप्टेंबरला मतदान, १९ सप्टेंबरला निकाल




  • सरपंचांची निवड मतदार करणार




  • आजपासून आचारसंहिता लागू




मुंबई : महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ सप्टेंबरला मतदान होणार असून यावेळी थेट सरपंच मतदारांकडून निवडला जाणार आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.


मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.


विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या


नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75.


धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02.


बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02.


अकोला: अकोट- 07 व बाळापूर- 01.


वाशीम: कारंजा- 04.


अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे- 01.


यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 08.


नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01.


हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04.


नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17.


पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.


अहमदनगर: अकोले- 45.


लातूर: अहमदपूर- 01.


सातारा: वाई- 01 व सातारा- 08.


कोल्हापूर: कागल- 01.


एकूण: 608

Comments
Add Comment