विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला डावलले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातले कामकाज निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला स्थान देण्यात आले नाही. मात्र, विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या शिंदे गटाला सहभागी करून घेण्यात आलेले नाही.


राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची कामकाज सल्लागार समिती आज गठित करण्यात आली. विधानसभेत शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट बहुमतात असल्यामुळे तेथे फक्त त्यांच्याच गटातल्या सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून त्यांनी नेमलेले गटनेते अजय चौधरी तसेच प्रतोद सुनील प्रभू यांचा समितीत समावेश करण्यात यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही विनंती फेटाळून लावली. त्यानंतर आज ही समिती जाहीर करण्यात आली.


विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या समितीचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे समितीचे सदस्य असतील. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अॅड. आशिष शेलार, छगन भुजबळ आणि अमिन पटेल हे निमंत्रित सदस्य असतील.


विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला स्थान देण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे समितीच्या प्रमुख असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, भाई गिरकर, प्रविण दरेकर आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.