शहाणपण हाच धर्माचा आत्मा

Share

इतिहासकालापासून आजतागायत जगात ज्या ज्या समस्या निर्मांण झालेल्या आहेत. त्याचे एकमेव कारण परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे होय. माणसाला परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल तेव्हा सर्वच समस्या नाही होतील असे मी म्हणणार नाही. पण ९५ टक्के समस्या या निश्चित सुटू शकतील. ५ टक्के समस्या या इतरांमुळे निर्माण होतात. एखादा माणूस बसस्टॉपला उभा आहे. एखाद्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व तो ट्रक सरळ बसस्टॉपवर घुसला व त्यात या माणसाचा जीव गेला. तो माणूस जगातून गेला त्यात या माणसाचा काय दोष होता? ५ टक्के समस्या या इतरांमुळे व ९५ टक्के समस्या या आपल्यामुळे निर्माण होतात. ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परमेश्वराबद्दलचे ज्ञान होणे आवयक आहे पण परमेश्वराबद्दलचे अज्ञान इतके प्रचंड आहे की देवाच्या भक्तीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आज सर्व ठिकाणी अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. देवाधर्माच्या नावाखाली दंगेधोपे, दहशतवाद, भांडणतंटे होतात. माणसे एकाच धर्माची असली तरी भांडणे करतात. पाच भाऊ हिंदू आहेत तरी भांडतात. पाच मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत तरी भांडतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकाच धर्माचे लोक असले तरी ते सुखी होतीलच असे नाही. तो कुठल्याही धर्माचा असू दे पण त्याला देव म्हणजे काय हे माहीत नाही, धर्म म्हणजे काय हे माहीत नाही तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. जगांत कुणीच सुखी नाही। “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे”. आज जगांत कोण सुखी आहे? श्रीमंत माणूस तोही दुःखी, गरीब हे गरिबीमुळे दुःखी. सत्ताधीशाला काही कमी आहे का तरीही त्यांना दुःख आहेच ते का? आपण पुन्हा निवडून येवू का? निवडून आल्यावर मंत्रीपद मिळेल का? आणि मिळाले तरी ते टिकेल का? विद्वान असला तरी तो ही दुःखी असतोच. याचे कारण शोधून काढत नाहीत. हेच जीवनविद्येने शोधून काढले ते म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल तेव्हा जगातल्या समस्या दूर होतील. एक शहाणा आहे पण बाकीचे वेडे असतील तर कसे होणार? घरात दहा माणसे आहेत. त्यात एकच शहाणा व बाकीचे वेडे असतील तर वेडयांची संख्या जास्त असल्यामुळे हा शहाणा त्यांना सुखी करू शकत नाही. जेव्हा माणसे शहाणी होतील तेव्हाच ती सुखी होतील. माझा एक सिध्दांत आहे, माणसाकडे शहाणपण येईल तेव्हा तो सुखी होईल. मी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ग्रंथात लिहून ठेवलेले आहे की शहाणपण हाच धर्माचा आत्मा आहे.

– सदगुरू वामनराव पै

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

19 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

27 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago