‘वर्षा’ बंगल्याचा यापुढे मुख्यमंत्री कार्यालयाच्या बैठकांसाठी वापर

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यावर राहायला जाणार का? असा प्रश्न विचारला जात होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे 'वर्षा'मधील मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बैठकांसाठी करणार आहे. त्यामुळे नंदनवन हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असेल.


महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी 'वर्षा' निवासस्थान सोडले होते. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर सहा दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावण्यात आली. तसेच 'वर्षा' बंगल्याची रंगरंगोटीही पूर्ण झाली. राज्यात सत्तांतर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शपथ घेतली. प्रथा आणि नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असते. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महिना उलटला तरी एकनाथ शिंदे 'नंदनवन' बंगल्यावर वास्तव्यास आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार इथल्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी कार्यलयाची पाहणी केली. त्यानंतर छोटेखानी पूजाही पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य न करण्याचा निर्णय घेतला. ते सध्या वास्तव्य करत असलेल्या 'नंदनवन' इथेच त्यांचा मुक्काम असेल. तर मुख्यमंत्री वर्षा, मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावर रोजच्या बैठका घेणार आहेत.

Comments
Add Comment

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि

घाटकोपर स्टेशनजवळील रविशा टॉवरला आग, २०० हून अधिक जणांची सुटका

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रविशा टॉवर या १३ मजली कमर्शियल इमारतीच्या पहिल्या

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर