मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळत असून राज्यातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणास आज रेड अलर्ट जारी केला असून या भागात अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १२ ऑगस्टनंतर पावसाची उघडीप होईल, असा अंदाज आहे. रविवारपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार वृष्टी होत असून आगामी काही दिवस तशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस पाऊसाचा जोर कायम राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…