Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीभाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो

भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो

शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत शरद पवारांचा हल्लाबोल

बापामती : भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. वेळीच सावध होत नितीश कुमार यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याचेही शरद पवारांनी नमुद केले. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याने राजकीय भुकंप झाले आहे. त्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, जेपी नड्डा म्हणतात की देशात फक्त भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील, छोटे-छोटे पक्ष संपतील. यातून एकच स्पष्ट होते की, नितीश कुमार यांची जी तक्रार आहे. त्यातून हे समजते ही भाजपला मित्रपक्षाला संपवायचे आहे. नितीश कुमार यांनी वेळीच सावध होऊन शहाणपणा दाखवल्याचे मत पवारांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा : राष्ट्रवादीने शिवसेनेला संपवले असे म्हणायचे का?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्हे घ्यावे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच असल्याचे वक्तव्य पवारांनी केले. एखाद्या पक्षाचा चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -