चेस ऑलिम्पियाड पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईमध्ये नुकतीच ४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे पदक विजेते खेळाडू मालामाल होणार आहेत.


चेन्नईमध्ये झालेल्या ४४व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने देखील कांस्य पदक जिंकले आहे. महिला संघाने पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व भारताची अनुभवी ग्रँडमास्टर हम्पीने केले होते. भारतीय खुल्या संघात प्रज्ञानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता.


खुल्या गटात भारताच्या पुरूष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा ३-१ असा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताचा टॉप सिडेड महिला अ संघाला ११व्या तसेच अंतिम फेरीत अमेरिकेकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकापासून वंचित राहावे लागले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी