चेस ऑलिम्पियाड पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईमध्ये नुकतीच ४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे पदक विजेते खेळाडू मालामाल होणार आहेत.


चेन्नईमध्ये झालेल्या ४४व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने देखील कांस्य पदक जिंकले आहे. महिला संघाने पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व भारताची अनुभवी ग्रँडमास्टर हम्पीने केले होते. भारतीय खुल्या संघात प्रज्ञानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता.


खुल्या गटात भारताच्या पुरूष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा ३-१ असा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताचा टॉप सिडेड महिला अ संघाला ११व्या तसेच अंतिम फेरीत अमेरिकेकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकापासून वंचित राहावे लागले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)