चेस ऑलिम्पियाड पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईमध्ये नुकतीच ४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे पदक विजेते खेळाडू मालामाल होणार आहेत.


चेन्नईमध्ये झालेल्या ४४व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने देखील कांस्य पदक जिंकले आहे. महिला संघाने पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व भारताची अनुभवी ग्रँडमास्टर हम्पीने केले होते. भारतीय खुल्या संघात प्रज्ञानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता.


खुल्या गटात भारताच्या पुरूष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा ३-१ असा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताचा टॉप सिडेड महिला अ संघाला ११व्या तसेच अंतिम फेरीत अमेरिकेकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकापासून वंचित राहावे लागले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि