Monday, April 21, 2025
Homeदेशबिहारमध्ये राजकीय भूकंप; जेडीयू-भाजप युती तुटली

बिहारमध्ये राजकीय भूकंप; जेडीयू-भाजप युती तुटली

पाटणा : बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली.

मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. २०१३ पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे.

जेडीयूच्या बैठकीनंतर नितीश कुमार थेट राजभवनात पोहोचले, जिथे त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश यांनी यासह सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांनी १६० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले आहे.

नितीश हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील – काँग्रेस
नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेसला सभापतीपद मिळू शकते.

फ्लोअर टेस्टसाठी तयारी
युती तुटल्यानंतर नितीश कुमारही आता फ्लोर टेस्टची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदारांना पुढील ७२ तास पाटण्यात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेत जेडीयूचे ४५ आमदार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -