अरुण बेतकेकर
”वरून बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा सर्व काही पाहतोय. तो तुम्हाला माफ करणार नाही. या मातीत तुम्ही खतम व्हाल. आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, Mark My Words” हा संजय राऊत यांना झालेला नवा साक्षात्कार. असे साक्षात्कार त्यांना वारंवार होत असतात. सतत बोलून अवलक्षण ओढवून घेणारे संजय राऊत यांचा दांडगा आत्मविश्वास विलक्षण आहे. असे नव नवे प्रयोग करताना आधीच्या वक्तव्याने माजलेल्या काहुरांचे स्वतःस विस्मरण झाल्याचे भासवत लाज, लज्जा सोडून नवे बेताल वक्तव्य ते करत असतात. काही उदाहरणे…
यामागील रहस्य असे, १९९२ साली संजय राऊत सामना दैनिकात पगारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. १९९८ साली स्वतःस दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेवर खासदारकी देण्याचे मान्य केले होते, असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात ते दिले गेले प्रितीश नंदी यांना. मनासारखे न घडल्याने राऊत प्रक्षुब्ध झाले. शिवसेना, बाळासाहेब व ठाकरे कुटुंब यांच्याविरोधात त्यांनी सामन्यातूनच आगपाखड सुरू केली होती. नेमक्या त्याच समयी मी लोकाधिकार समितीच्या कामानिमित्त सामना कार्यालयावर पोहोचलो. मला राऊत म्हणाले, “सामना वाचलात का? ठाकऱ्यांची कशी उतरवली आहे. आपणासही ठाऊक आहे. मला खासदारकी बहाल केली होती. पैशाचा व्यवहार करून ती प्रितीश नंदीना दिली. मराठी माणसाचा घात केला. आता पुढे पाहा या बाप-लेकाचे (बाळासाहेब आणि उद्धव) कपडे उतरवून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. काय करतील सामन्यातून काढून टाकतील. पण अन्य ठिकाणी जाऊन मी हेच जारी राखेन. इतकी वर्षे सामन्यात बसून उखडलेली नाहीत. ठाकरे कुटुंबाचे शेकडो छक्के-पंजे पुराव्यासह माझ्याकडे आहेत.”
राऊतांचे हे शब्द ऐकताच मीही संतापलो होतो. तेथेच त्याला ठोकणार होतो. पण बाळासाहेबांनीच त्यास दिलेल्या खुर्चीचा मान राखत संयम राखला. लागलीच संपूर्ण घटना व माझ्या भावना मातोश्रीवर प्रत्यक्ष भेटून शब्दश: बाळासाहेब व उद्धवजींच्या कानावर घातल्या. अपेक्षित होते त्यावर कारवाई होईल. पण आश्चर्य म्हणजे, राऊतांविरुद्ध सक्त कारवाई करण्याऐवजी त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला आणि त्यांना बोलावून आम्ही तडजोडीने हा प्रश्न सोडवू, असे म्हणाले. हे ऐकताच बाळासाहेबांसारख्या कोणाचीही तमा न बाळगणाऱ्या आक्रमक व्यक्तीसही हतबल झालेला मी पहिला. जर ही स्थिती बाळासाहेबांची, तर उद्धवजींकडे यास तोंड देण्याची क्षमता असेल का? ठाकरे कुटुंबाविषयीचे असे कोणते छक्के-पंजे राऊत यांच्या हाती आहेत, हे ठाकरे आणि राऊतच जाणे. पण हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हे निश्चित. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक गेले, शिवसेना संपतेय तरी बेहत्तर. पण संजय राऊत टिकले पाहिजेत. उद्धवजींच्या या एका वागण्याने अधोरेखित होते की, ठाकरेंच्यासाठी राऊत ही भिंतीतली सहन न होणारी एक खुंटी आहे.
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…