फक्त 'विश्वास' हवा

डॉ. मिलिंद घारपुरे


आठवून बघा कधीतरी, केव्हातरी, अशीच एखादी छोटी-मोठी घटना तुमच्या-माझ्या आयुष्यात घडून गेलेली... डोळे विस्फारायला लावणारी, आश्चर्यकारकरित्या घडलेली... नसली तर श्रद्धा निर्माण करणारी... असली तर ती दृढ करणारी, थोडीफार सारखी...!


एक तरुण ऑर्थोपेडिक सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ. एका संध्याकाळी रोड अॅक्सिडेंटची केस त्याच्याकडे येते. तरुण मुलगा. मांडीच्या हाडा-मांसाचा लगदा. जीव वाचला होता. पण आता पाय वाचवायचा होता. अत्याधिक रक्तस्त्राव. वेळ हाताशी कमी. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन.


सगळी तयारी झालेली. कॉन्फिडन्स होता. पण तरीही प्रकर्षाने त्यांना स्वतःच्या सरांशी चर्चा करायची होती. चर्चेपेक्षा आधार किंवा सल्ला हवा होता म्हणूयात त्यांच्याच भाषेत. अगदी त्याच दुपारच्या फ्लाइटने सर परदेशी गेलेले. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळ शिवाय कॉन्टॅक्ट अशक्य.


...आणि चक्क त्या सरांचा फोन. मध्ये कुठल्या तरी एअरपोर्टला कनेक्टिंग फ्लाइटच ले-ओवर काही कारणाने वाढलेलं. स्वतःच्या काही वैयक्तिक कामासाठी त्या सरांनी यांना फोन केलेला. थोडेसे अविश्वसनीय.


अर्थातच दोघांची या ॲक्सिडेंटच्या केसवर अत्यंत सविस्तर चर्चा आणि मिशन कंप्लीट!!!


थोडक्यात... अडचणीच्या वेळी मदत उभी राहते. गहन प्रश्नांची उत्तरे असतात, सापडतात, मिळतात. कुठूनही... कशीही... योग्य वेळी...


...फक्त 'विश्वास' हवा स्वतःवर आणि 'श्रद्धा' हवी स्वतःच्या सद्हेतूवर...

Comments
Add Comment

नारळ लागवडीतून कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळ

समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना

शिस्त आणि काटेकोर नियमपालनाची वर्षपूर्ती...

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने १९ डिसेंबर, २०२४ रोजी सभापतीपदी एकमताने निवड

कौटुंबिक आघात : मनावर साचलेला भावनिक त्रास

कौटुंबिक आघात किंवा फॅमिली ट्रॉमा म्हणजे असा भावनिक आणि मानसिक त्रास, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित

मैत्रीचा नवा अध्याय

कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी भारत-रशिया संबंधांमध्ये सातत्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात

लढा ससून डॉक वाचवण्याचा

मुंबई शहराच्या वाढत्या जडणघडणावेळी इतर वास्तूंप्रमाणेच एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कुलाब्यातील ससून डॉक आज

विकासाचे महामार्ग...

देशात रस्ते विकासाला गती देण्यात आली आहे. एकाच दिवशी जास्त किलोमीटर रस्त्याचे काम करण्याचा विक्रम नोंदवला गेला