मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश यांनी ३ ऑगस्टच्या रात्री लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्येचा सामना करत होते.
मिथिलेश चतुर्वेदी यांना काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनतर ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मूळ गावी लखनऊला गेले होते.
मिथिलेश चतुर्वेदी यांच्यासोबत ‘क्रेझी ४’ आणि ‘कोई मिल गया’ या सिनेमात काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी सांगितले की, ‘मिथिलेशजींसोबत माझे खूप जवळचे नाते होते. मला त्याच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी ४’ मध्ये काम करण्याचे सौभाग्य मिळाले. ‘क्रेझी ४’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. जेव्हा आपण एखाद्याला इतक्या जवळून ओळखता तेव्हा खूप त्रास होतो. त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कौशल्याचा आणि प्रतिभेचा बारकाईने वापर करून घेता आला. अशी चांगली माणसे जग सोडून जातात तेव्हा खूप त्रास होतो.