ऑगस्टमध्ये राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू झाला आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडेल. मात्र, पावसाचे प्रमाण जुलैपेक्षा कमी असेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


तापमान वाढीमुळे संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात ऊन-पावसाचा लपंडाव चालणार आहे. खरंतर यावर्षी राज्यात पाऊस लवकर येणार असा अंदाज असतानाही पावसाचे आगमन काहीसे उशिराच झालेले दिसून आले. यामुळे पाण्याची कमतरता काही भागांमध्ये विशेष जाणवली. जून महिना कोरडा गेल्याने राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. परिणामी, पाण्याची टंचाई भासू लागली होती.


जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढला. परंतु, सध्या वाऱ्यांच्या दिशेत बदल झाला आहे आणि जमिनीवर हवेचा दाब वाढल्याने समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ऑगस्ट महिन्यात काही भागात किरकोळ पाऊस पडेल, पण त्यानंतर तेथे उघडीप होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.


दरम्यान राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन टक्केच अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यास अनुकूल हवामान नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाऱ्यांची दिशा बदलून वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतील. त्यामुळे राज्यातील कोरड्या भागात पाऊस पडेल. धुळे, लातूर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद या पाच जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस पडेल. या भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात आणि घाट भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.