नाशिक (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलला पॅकेज घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बीएसएनएल आता ग्रामीण भागासह शहरी भागात ४ -जी आणि ५- जीची सेवा देण्यासाठी जोमाने पावले टाकण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलला १६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या बीएसएनएलला ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती देताना बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात या घोषणेमुळे ग्रामीण भागात बीएसएनएल फोर -जी आणि फाईव्ह -जी ची सेवा देणार आहे.
विशेष म्हणजे भारत ब्रॉड बॅण्ड नेटवर्क लिमिटेड या कंपनीचेही बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे १४ लाख किलोमीटर फायबर ऑप्टिकलचे जाळे असणारी जगातील मोठी नेटवर्क कंपनी म्हणून बीएसएनएल उदयास आली आहे. भारत ब्रॉड बॅण्ड नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देशभरातील सहा लाख ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकलने जोडण्यात आल्या असून आता ही कंपनीदेखील बीएसएनएलमध्ये विलीन करण्यात आली.
त्यामुळे बीएसएनएलची स्वतःची साडेआठ लाख किमी व बीबीएनएलची साडेपाच लाख किलोमीटर अशी एकूण १४ लाख किमी. फायबर ऑप्टिकल असलेली देशातील एक नंबर तर जगातील मोठी नेटवर्क कंपनी म्हणून बीएसएनएलची ओळख निर्माण झाली आहे. देशातील सर्व खासगी नेटवर्क कंपन्यांचे मिळून फायबर ऑप्टिकलचे जाळे ५ लाख किमी. असल्याची माहिती उपमहाप्रबंधक राजेश हिरे यांनी दिली.
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…