पुणे : जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं येत्या २ ते ३ दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातील पडलेल्या पावसाने कोकणात चागंलीच बॅटिंग केली आहे. कोकण पाठोपाठ विदर्भ, मुबंईसह पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. पुण्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०१४ मध्ये ५३.१ मिलिमीटर तर, त्याआधी १९६७ मध्ये ७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील चार दिवस शहरासह राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…