उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर अनिल बोंडेंची खोचक टीका

अमरावती (हिं.स.) : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना झाडावरून गळून पडलेल्या पाला पाचोळ्याची उपमा दिली आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे यांनीदेखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याच. मात्र शिवसेनेवर ओढवलेल्या परिस्थितीवरही खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हटले एवढी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असे अनिल बोंडे म्हणाले. तर अब पछतानेसे क्या फायदा, चब चिडीया खेत चुग गई.. अशी शायरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले, यावरही अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली.


अनिल बोंडे यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद हे देवाच्या आशीर्वादाने मिळाले, असे आम्ही मानतो. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश पाळला, असे उत्तर अनिल बोंडेंनी दिले. भाजपला मुंबई तोडायची आहे, असा आरोपही केला जात आहे, यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, आता ते काहीही आवई उठवतील. मराठी माणूस तोडायचाय, मुंबई तोडायचीय. पण देवेंद्र फडणवीसांनी आधीच स्पष्ट केले आहे. संपूर्ण मराठी माणसांना ते एकत्र आणणार आहेत.


टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार


अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथील टेक्स्टाइल पार्क औरंगाबादला पळवले जाणार असल्याचे आरोप केले. यावर उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, ही पळवापळवी काँग्रेसच्या काळात चालायची. आता ते होणार नाही. अमरावतीचे टेक्सटाइल पार्क अमरावतीतच होणार आहे..

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला