राज्यसभेचे १९ सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

  36

नवी दिल्ली (हिं.स.) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध विषयांवरून गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षातील १९ राज्यसभा सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी लोकसभेच्या ४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज, मंगळवारी राज्यसभेतील १९ सदस्यांवर कारवाई करण्यात आली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधक सातत्याने आंदोलन करीत आहेत. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. राज्यसभेत आज, मंगळवारी कामकाज सुरू होताच विरोधकांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला. परंतु, विरोधी सदस्य ऐकण्यास तयार नसल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करणायत आली.


यावेळी राज्यसभा उपसभापतींनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, नदीमल हक, अभि रंजन बिस्वास, शांता छेत्री, आणि डोला सेन हे तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आहेत. तसेच मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित केलेल्या खासदारांपैकी ७ जण हे टीएमसी पक्षाचे आहेत.


यापूर्वी सोमवारी २५ जुलै रोजी लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेसच्या ४ खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांचा समावेश असून त्यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके