राज्यसभेचे १९ सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

नवी दिल्ली (हिं.स.) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध विषयांवरून गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षातील १९ राज्यसभा सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी लोकसभेच्या ४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज, मंगळवारी राज्यसभेतील १९ सदस्यांवर कारवाई करण्यात आली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधक सातत्याने आंदोलन करीत आहेत. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. राज्यसभेत आज, मंगळवारी कामकाज सुरू होताच विरोधकांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला. परंतु, विरोधी सदस्य ऐकण्यास तयार नसल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करणायत आली.


यावेळी राज्यसभा उपसभापतींनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, नदीमल हक, अभि रंजन बिस्वास, शांता छेत्री, आणि डोला सेन हे तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आहेत. तसेच मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित केलेल्या खासदारांपैकी ७ जण हे टीएमसी पक्षाचे आहेत.


यापूर्वी सोमवारी २५ जुलै रोजी लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेसच्या ४ खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांचा समावेश असून त्यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड