संतोष राऊळ
कणकवली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आयकर विभागाने दिलेली आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स भरताना जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यतः भारत सरकारची https://www.incometax.gov.in एकच वेबसाइट असल्यामुळे सध्या ही साइट अपेक्षेपेक्षाही खूपच स्लो चाललेली आहे. त्यामुळे गत वर्षीप्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढून मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत सरकारची एकच वेबसाइट असल्यामुळे जून-जुलै या महिन्यात टॅक्स भरण्याचा अंतिम टप्पा असल्याने वेबसाइटवर गर्दी असते व लोड असल्याने ही वेबसाइट फारच स्लो झालेली असते. आजघडीला एआयएस ओपन होत नाहीये. एआयएस ओपन होण्यास अनेक वेळा अडचणी येत आहेत.
आधार ओटीपी ग्राहकापर्यंत पोहोचत नाही, तर रिटर्न फाइल अपलोड करताना वेबसाइट स्लो असल्यामुळे अर्ध्यावरच डिस्कनेक्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे क्रोम पेजवर ही वेबसाइट ओपनच सध्या होत नाहीये. त्यामुळे सीए आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इन्कम टॅक्स भरण्याच्या मुदतीचे फक्त ८ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. असे असताना वेबसाइट स्लो झाल्यामुळे काम खोळंबले आहे. गत वर्षी ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पहिल्यांदा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या वर्षीसुद्धा तशी ती वाढवली जावी, अशी मागणी सीए आणि त्यांच्या ग्राहकांकडून केली जात आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधी तुम्हाला आयकर https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागते. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रवीष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागते. मात्र ही प्रक्रिया खूपच धिम्यागतीने चालल्यामुळे फाइल अपलोड होत नाहीत. त्याबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि मुदतवाढ करावी, अशी मागणी होत आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…