अमरावतीत रेल्वे क्रॉसिंगवर बस बंद पडली, काझीपेठ एक्स्प्रेसचा खोळंबा

  59

अमरावती (हिं.स.) : चांदूर रेल्वे शहराबाहेर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर चांदूर रेल्वे आगाराची एसटी बस बंद पडल्यामुळे काझीपेठ सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास २९ मिनिटे उभी राहिली आहे.


अमरावती वरून चांदूर रेल्वेकडे मालखेड मार्गे येणारी चांदूर रेल्वे आगाराची एसटी बस शहराबाहेर रेल्वे क्रॉसिंगवरून येत असतांना ऐन मधातच ट्रॅकवर सदर एसटी बंद पडली. धक्का देऊन बस काढण्याचा प्रयत्न केला असता तरी सदर बस निघाली नाही. त्यामुळे दुसरी एसटी बस बोलाविल्यानंतर दोरीच्या साहाय्याने बांधून ओढण्यात आले. व नंतर एसटी बस निघाली. यानंतर थांबलेली एक्सप्रेस गाडी रवाना करण्यात आली.


या कालावधीत पुणे ते काजीपेठ दरम्यान धावणारी काझीपेठ सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास २९ मिनिटे उभी राहिल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली. या प्रकारामुळे रेल्वे विभागाचे शेड्युल बिघडले असून एसटी महामंडळाला दंड बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारावरून एसटी महामंडळाने सुद्धा भंगार बसेस न चालविता चांगल्या प्रकारच्या एसटी बसेस रस्त्यांवर चालवायला हव्या असा सूर प्रवाशातून व्यक्त होत आहे.


अनेक भंगार बसेस रस्त्यांवर


अमरावती जिल्ह्यातील आठही बस डेपो मध्ये अनेक भंगार बसेस आहेत त्या सुद्धा रत्यांवर धावत आहेत अश्या बसेसचा केंव्हा ही अपघात होण्याची शक्यता आहे. या बसेस रत्यांवर चालवण्यात येऊ नये अशी मागणी एसटी च्या विविध कामगार संघटनांनी केली आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात एखाद्या वेळेस एस टी चा मोठा अपघात होण्याशी शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी