बांठिया आयोग अहवालानुसार निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असे कोर्टाने स्पष्ट केल्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.


न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी झाली. यामध्ये वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगाने पाहावा, असे कोर्टाने स्पष्ट केले.


राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तीवाद केला. सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचे याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितले.


बांठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणूका व्हायला हव्यात असे आमचेही मत आहे. जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.


दरम्यान, जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली समर्पित आयोगाच्या सदस्यांमध्ये प्राध्यापक के एस जेम्स, संचालक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस श्री शैलेशकुमार दारुका सहयोगी प्राध्यापक आणि संचालक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, एच बी पटेल सेवानिवृत्त प्रधान सचिव कायदे व न्याय विभाग महाराष्ट्र शासन, श्री महेश झगडे सेवानिवृत्त महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी नरेश गित्ते असे सहा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि पंकज कुमार व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ, महाराष्ट्र सरकार यांची आयोगाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या आयोगाने ग्रामविकास विभागाचे सचिव उपसचिव विभागीय कमिशनर जिल्हाधिकारी राजकीय पक्षाचे नेते आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन जनतेची मते जाणून घेतली. त्यानुसार १५७१ निवेदने आली. विकास गवळी या याचिकाकर्त्यांबरोबर आणि १३ राजकीय पक्षांचा प्रतिनिधी बरोबर चर्चा केली.

Comments
Add Comment

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,

अरे बाप रे! 'या' गावात ४० टक्के ग्रामस्थांकडे एकच किडनी

देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन नवी दिल्ली :

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन