रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं कुंभार्ली घाटानजीक सोनपात्र वळण येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड हटविण्यासाठी त्या ठिकाणी जेसीबी रवाना करण्यात आले होते दरम्यान, या मार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद झाली होती मात्र आता मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असलेल्या कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खेड तालुक्यामधील रघुवीर घाटातही दरड कोसळली आहे. सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या घाटात अवघड आणि अरुंद वळणे आहेत. त्यामुळे हा रस्ता मुळातच काहीसा असुरक्षित आहे. दरवर्षी या घाटात पावसाळ्यात दरड कोसळते. यावर्षीही आज दरड कोसळली असून ती दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा रवाना केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…