गोंदिया (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७६७ घरे उध्वस्त झाली असून ३९ जनावरे दगावली आहेत.
गोंदिया जिल्हासाठी जुलै महिना नैसर्गिक आपत्तीचा ठरला असून सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ११ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी चौघांचा पुरात वाहून तर ७ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. यासोबतच जिल्ह्यात घरे, गोठे असे एकूण ७६७ संपत्तींचे नुकसान झाले आहे. तर ३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे आता पर्यंत ११ मृतका पैकी ५ मृतक व्यक्तींच्या वारसांना मदत म्हणून २० लाख रुपये देण्यात आले असून ६ प्रकरणे प्रलंबीत आहेत. जिल्हाला नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ३० लाख २६ हजार रुपये प्राप्त झाले असून त्यात २० लाख रुपये संबंधितांना मदत करण्यात आलेली आहे. लवकरच इतर मृत व्यक्तिना मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…