अतिवृष्टीचा शेतीला फटका, भाजीपाला महागला

  136

मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरणीवर परिणाम झाला. तर जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्ठीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांचे दर वाढले असून ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.


मुंबईला प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे. नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के होत आहेत. नाशिकमधून मुंबईला येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.


अतिवृष्टी झाल्याने मुंबई आणि ठाण्याला होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर महागले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत भेंडी ६० ते ८० रुपये किलो, गवारी ६० ते ८० रुपये, शिमला मिरची ३० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, वांगी ४० रुपये तर फ्लॉवर ४० ते ६० रुपये किलो प्रमाणं विक्री केली जात होती. तर, या आठवड्यात भेंडीचा दर प्रतिकिलो १०० ते १२०, गवारीचा दर १०० ते १२०, शिमला मिरची ४० ते ५०, दुधी भोपळा ५० ते ६०, वांगी ६० आणि फ्लॉवर ८० रुपये किलोने विकला जात आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला