पाऊस होऊनही नवी मुंबईकर तहानलेले

Share

नवी मुंबई (वार्ताहर) : पालिकेच्या मालकीचा असणाऱ्या मोरबे धरण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे धरणात पाण्याची वाढ ही चांगली झाली आहे. परंतु नवी मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळ एकीकडे मोरबे धरणात समाधानकारक पाऊस असून देखील पाणी पुरवठा कमी का, असा सवाल नवी मुंबईकर करत आहे.

२००५ मध्ये मोरबे धरण पालिकेने विकत घेतल्यावर किमान तीस वर्ष तरी पाण्याचे संकट पालिकेवर येणार नाही, याची ग्वाही देण्यात येत आहे. परंतु मोरबे धरण घेतल्यावर या घटनेला सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तर पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवले गेले. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ऐरोली ते बेलापूर दरम्यान असणाऱ्या सात विभाग कार्यालय परिसरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. परंतु या निर्णयाला सर्व स्थरातून विरोध झाल्याने पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. हे सर्व चालू असताना शहरातील गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जशेच्या तसे आहे. यामुळे माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी मुख्यालयावर हंडा मोर्चा तर ऐरोलीमध्ये सेनेने मटका फोड आंदोलन केले होते.

राज्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणांमधील पाणी पातळी वाढली आहे. यामध्ये मोरबेदेखील चांगल्या पैकी भरले आहे. मोरबे धरणाची उंची ८९ मीटर आहे. आताच्याघडीला धरण परिसरात एकूण १७०७.२० मिली मीटर इतके पर्ज्यान्यमान झाले आहे. तर धरणाच्या पातळीत वाढ होऊन ७९.५३ पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच धरणाची पातळी पूर्ण भरण्यासाठी मोजून दहा मीटर बाकी आहे. त्यामुळे साठलेले पाणी किमान डिसेंबर महिन्याचा शेवट गाठू शकते. परंतु ही वस्तुस्थिती असतानाही गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये आजही पाण्याची कमतरता आहे, सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव यांनी सांगितले.

मोरबे धरणात चांगला पाऊस झाला आहे.तरीही नवी मुंबई मधील काही भागात पुरेसे पाणी मिळत नाही.यामुळे समाज माध्यमावर काही घटकांनी मोरबे धरण चोरीला गेले की काय असा पालिका आयुक्तांना चिमटा काढला आहे.

मोरबे धरण परिसरात पाऊस चांगला पडत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच नवी मुंबई शहरात नागरिकांना अपेक्षित पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु असे असतानाही नागरिकांच्या पाण्याविषयी तक्रारी येत आहेत. यावर चौकशी करून पाणी का मिळत नाही, याची माहिती घेतली जाईल. -संजय देसाई, शहर अभियंता, पालिका.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago