पाऊस होऊनही नवी मुंबईकर तहानलेले

नवी मुंबई (वार्ताहर) : पालिकेच्या मालकीचा असणाऱ्या मोरबे धरण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे धरणात पाण्याची वाढ ही चांगली झाली आहे. परंतु नवी मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळ एकीकडे मोरबे धरणात समाधानकारक पाऊस असून देखील पाणी पुरवठा कमी का, असा सवाल नवी मुंबईकर करत आहे.


२००५ मध्ये मोरबे धरण पालिकेने विकत घेतल्यावर किमान तीस वर्ष तरी पाण्याचे संकट पालिकेवर येणार नाही, याची ग्वाही देण्यात येत आहे. परंतु मोरबे धरण घेतल्यावर या घटनेला सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तर पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवले गेले. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ऐरोली ते बेलापूर दरम्यान असणाऱ्या सात विभाग कार्यालय परिसरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. परंतु या निर्णयाला सर्व स्थरातून विरोध झाल्याने पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. हे सर्व चालू असताना शहरातील गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जशेच्या तसे आहे. यामुळे माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी मुख्यालयावर हंडा मोर्चा तर ऐरोलीमध्ये सेनेने मटका फोड आंदोलन केले होते.


राज्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणांमधील पाणी पातळी वाढली आहे. यामध्ये मोरबेदेखील चांगल्या पैकी भरले आहे. मोरबे धरणाची उंची ८९ मीटर आहे. आताच्याघडीला धरण परिसरात एकूण १७०७.२० मिली मीटर इतके पर्ज्यान्यमान झाले आहे. तर धरणाच्या पातळीत वाढ होऊन ७९.५३ पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच धरणाची पातळी पूर्ण भरण्यासाठी मोजून दहा मीटर बाकी आहे. त्यामुळे साठलेले पाणी किमान डिसेंबर महिन्याचा शेवट गाठू शकते. परंतु ही वस्तुस्थिती असतानाही गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टीमध्ये आजही पाण्याची कमतरता आहे, सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव यांनी सांगितले.


मोरबे धरणात चांगला पाऊस झाला आहे.तरीही नवी मुंबई मधील काही भागात पुरेसे पाणी मिळत नाही.यामुळे समाज माध्यमावर काही घटकांनी मोरबे धरण चोरीला गेले की काय असा पालिका आयुक्तांना चिमटा काढला आहे.


मोरबे धरण परिसरात पाऊस चांगला पडत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच नवी मुंबई शहरात नागरिकांना अपेक्षित पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु असे असतानाही नागरिकांच्या पाण्याविषयी तक्रारी येत आहेत. यावर चौकशी करून पाणी का मिळत नाही, याची माहिती घेतली जाईल. -संजय देसाई, शहर अभियंता, पालिका.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र