खड्ड्यामुळे आणखी एक बळी!

Share

ठाणे : केडीएमटी बसच्या धडकेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. या मृत्यूला खड्डेच जबाबदार असून याधीही पाच जुलैला ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता.

नेवाळी खोणी गाव नाक्याजवळ शनिवारी सकाळी केडीएमटीच्या कल्याण-पनवेल बस क्रमांक २० या गाडीने एमएच ०५ ८२२५ नंबरच्या दुचाकीला धडक दिली. खड्ड्यामुळे या तरुणाच्या गाडीचा तोल गेला आणि बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, नेमका हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात घडला की बस चालकाच्या चुकीने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

याआधी पाच जुलैलाही ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता. खड्ड्यामुळे तोल जाऊन खाली पडलेल्या तरुणाच्या शरीरावरुन भरधाव एसटी धडधडत गेली होती आणि त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होत आहे. तर दुचाकीस्वारांचा खड्ड्यांमधूनच जीवघेणा प्रवास सुरु आहे. मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यानंतर आता रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे बुजवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर केव्हा काम करणार, असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

50 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago