खड्ड्यामुळे आणखी एक बळी!

  79

ठाणे : केडीएमटी बसच्या धडकेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. या मृत्यूला खड्डेच जबाबदार असून याधीही पाच जुलैला ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता.


नेवाळी खोणी गाव नाक्याजवळ शनिवारी सकाळी केडीएमटीच्या कल्याण-पनवेल बस क्रमांक २० या गाडीने एमएच ०५ ८२२५ नंबरच्या दुचाकीला धडक दिली. खड्ड्यामुळे या तरुणाच्या गाडीचा तोल गेला आणि बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


या अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, नेमका हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात घडला की बस चालकाच्या चुकीने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.


याआधी पाच जुलैलाही ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता. खड्ड्यामुळे तोल जाऊन खाली पडलेल्या तरुणाच्या शरीरावरुन भरधाव एसटी धडधडत गेली होती आणि त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होत आहे. तर दुचाकीस्वारांचा खड्ड्यांमधूनच जीवघेणा प्रवास सुरु आहे. मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यानंतर आता रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे बुजवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर केव्हा काम करणार, असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता