मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने डिजिटल सिस्टमवर अधिक भर दिला असून बेस्टने डिजिटल तिकीट सेवा सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवणे यासाठी बेस्टने ऑटोमॅटिक सिस्टमवर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने डिजिटल सेवा सुरू केली. बेस्टचे ‘चलो’ सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरत आहे. बेस्टचे १२ टक्के प्रवासी ‘चलो’ अॅपचा वापर करतात.
बेस्टने स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यावरही भर दिला आहे. यात डिजिटल तिकीटिंगमुळे प्रवाशांना घरबसल्या सेवा मिळत असून प्रवाशांना ऑनलाइन रिचार्जची सुविधाही उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारा सुट्ट्या पैशांचा वादही संपला. डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के म्हणजे १८ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी या सोयीचा वापर केला आहे.
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…