बेस्टच्या डिजिटल तिकिटाला प्रवाशांची पसंती

  87

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने डिजिटल सिस्टमवर अधिक भर दिला असून बेस्टने डिजिटल तिकीट सेवा सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.


बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवणे यासाठी बेस्टने ऑटोमॅटिक सिस्टमवर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने डिजिटल सेवा सुरू केली. बेस्टचे 'चलो' सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरत आहे. बेस्टचे १२ टक्के प्रवासी 'चलो' अॅपचा वापर करतात.


बेस्टने स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यावरही भर दिला आहे. यात डिजिटल तिकीटिंगमुळे प्रवाशांना घरबसल्या सेवा मिळत असून प्रवाशांना ऑनलाइन रिचार्जची सुविधाही उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारा सुट्ट्या पैशांचा वादही संपला. डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के म्हणजे १८ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी या सोयीचा वापर केला आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री