नेपाळमध्ये राजकीय संकट

पंतप्रधानांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण


काठमांडू (वृत्तसंस्था) : पाकिस्तान, श्रीलंकेप्रमाणे नेपाळमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शेर बहादूर देऊबा यांच्या सरकारच्या गैरकारभारामुळे विरोधी पक्षनेते के. पी. ओली शर्मा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांच्या भूमिकेला नेपाळच्या सत्ताधारी पक्ष नेपाळी काँग्रेसनेही समर्थन देत पंतप्रधानांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. के. पी. शर्मा ओली यांनी देशातील आघाडी सरकारने विश्वास गमावला असून त्यांचे सत्तेत राहण देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

शेर बाहदूर देऊबा यांनी गेल्या वर्षी १३ जुलै रोजी सरकार स्थापन केले होते. देऊबा सरकारमध्ये जनार्दन शर्मा यांना अर्थमंत्रिपद देण्यात आले होते. अर्थसंकल्प लीक केल्याचा आरोप झाल्याने शर्मा यांना पदावरुन हटवण्यात आले होते. शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपद स्वत: कडे ठेवले होते. देऊबा सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला के पी शर्मा ओलींनी विरोध केला होता.

काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार के पी शर्मा ओली यांनी शेर बहादूर देऊबा सरकारने विश्वास गमावला आहे. देशात अशाच घटना सुरु राहिल्यातर नेपाळमध्ये श्रीलंकेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे ओली म्हणाले. अर्थसंकल्प बनवण्याच्या प्रक्रियेत उद्योजक प्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात आले आहे. देशात शस्त्र खरेदी सुरु असल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे सरकारला काही घटकांचे समर्थन असू शकते, आपण सावध राहिले पाहिजे, असे केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे.

शेर बहादूर देऊबा यांच्या पक्षातही त्यांच्या कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. शेखर कोयराला यांनी संविधानात, बदल करण्याच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. शेखर कोयराला यांनी नेपाळी काँग्रेसने डाव्या पक्षांशी आघाडी करुन पक्षाच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम देऊबा यांचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. कोयराला समर्थकांनी देऊबा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात