आधी 'डुक्कर, गद्दार' आणि आता 'चिमण्यांनो परत या' कशासाठी?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार करत नाहीत, असा टोला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ४० आमदार फोडले. अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र त्यांच्या यात्रेला न जुमानता आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांबावून गेलेले आदित्य यांनी काल निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना त्यांनी मातोश्रीवर येण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, असे म्हटले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1546326840809164807

शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी आर्त हाक घालायची... पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे.. राजसाहेब ठाकरे...!!, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment

दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा

गोरेगावमध्ये पोलिसांकडून बेवारस नवजात बाळाची सुटका

मुंबई: बंगूर नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या रात्री उशिराच्या गस्तीदरम्यान गोरेगाव येथे दोन पार्क

'भाऊबीज' साठी बेस्टच्या १३४ अतिरिक्त बस फेऱ्या

मुंबई: आगामी भाऊबीज सणासाठी प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड

अनधिकृत फटाके स्टॉल्सवर मोठी कारवाई; ९४३ किलोहून अधिक फटाके जप्त

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात बेकायदेशीरपणे फटाके विकणाऱ्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. चार

मान्सूनची मस्ती: देवांची मुंबईत गडगडाटासह दिवाळी! मुंबई, ठाण्यात दिवाळीत मिम्सचा पाऊस

मुंबई: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दिवाळीतील फटाक्यांच्या

लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर पावसाचे पाणी; विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये 'अवकाळी'

मुंबई: दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईसह महाराष्ट्रभरात