आधी 'डुक्कर, गद्दार' आणि आता 'चिमण्यांनो परत या' कशासाठी?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार करत नाहीत, असा टोला मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ४० आमदार फोडले. अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र त्यांच्या यात्रेला न जुमानता आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांबावून गेलेले आदित्य यांनी काल निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना त्यांनी मातोश्रीवर येण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, असे म्हटले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1546326840809164807

शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी आर्त हाक घालायची... पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे.. राजसाहेब ठाकरे...!!, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.